पावसाने दडी मारल्याने  पिके करपली




आष्टी : तालुक्यात पावसाने दीर्घ काळ दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके करपू लागली आहेत. उडिद, सोयाबीन, मुग दाणे
भरण्याच्या अवस्थेत आहे. तर कापूस फुले पाते ने बहरत आहे. खरीप पिकांना ऐन फळधारणेच्या वेळी पावसाची नितांत गरज
असताना पावसाचा दीर्घ काळ खंड पडला आहे. एक महिन्यापासून पाऊस नसल्याने 1 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात
आले आहेत. पिके माना टाकुन करपू लागली आहेत. दोन ते चार दिवसात पाऊस होईल या आशेने शेतकरी पावसाची आतुरतेने
वाट पाहत आहेत.
जुन महिन्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतक-यांनी काळ्या आईची ओटी भरली. पाऊसाचा सततचा लपंडाव सोसत पिके
जोमाने शिवरात डौलत होती. उडिद, सोयाबीन, मुग दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाऊसाने दडी मारल्याने  खरीपातील
पिके करपू लागली जलसिंचनाची सोय असलेले शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत.रोग नियंत्रणासाठी व भरघोस
उत्पन्नासाठी शेतक-यांनी मोठा खर्च केला असून सर्व प्रयत्न व्यर्थ जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी उध्वस्त, सरसकट नुकसान भरपाई द्या : जून महिन्यातील चांगल्या पावसाने खरीप
हंगामाच्या आशा पल्लवीत केल्या. पिकांना पोषक वातावरण तयार झाले. शेतात पिके डौलात येऊन उडिद, सोयाबीन, कापूस हे
पिके फळधारणेच्या अवस्थेत आहेत. पिकांना पाण्याची नितांत गरज आहे,परंतु गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने
शेतकरी हतबल होऊन तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाअभावी जमिनीला भेगा पडत असून पिके करपू लागले आहे. पिके
वाचविण्यासाठी  जलसिंचन सोय असलेले शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. परंतु, ज्या शेतकर्‍यांकडे या सुविधा
नाहीत त्यांना पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे. लवकर पाऊस आला नाही तर उत्पादनात मोठी घट होणार आहे.पिकांची
फुल गळ होऊन माना टाकल्या आहेत. शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत करावी.
राम सांगळे, शेतकरी, कर्‍हेवाडी.सुकण्याच्या अवस्थेतील पिकांना फवारणी केल्यास काही दिवस जिवनदान मिळेल पावसाच्या विलंबामुळे हलक्या जमिनीवर व
कमी पावसावर पेरणी केलेल्या शेतातील पिके सुकू लागली आहेत. उडिद पिकाची फळधारणा सुरू असून पावसाने ओढ दिल्यास
फायदा ही होतो जास्त प्रमाणात फुले लागतात शेतक-यांनी घाबरून न जाता 13 तारेख्यानंतर पाऊस येईल असा अंदाज
वर्तवण्यात आला आहे. पिकावर 13-0-45 किंवा 19-19-19 या औषधाची प्रति लिटर 5 ग्रॅम वापरून सकाळी किंवा
सायंकाळी फवारणी करुन पिकांना 3 ते 4 दिवस जिवनदान मिळू शकते अंतरमशागत राहिलेल्या शेतकर्‍यांनी कोळपणी व
खुरपणी केल्यास ही काही दिवस पिकांना जीवनदान मिळते.
राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.खरिप पिक निहाय पेरा
तालुक्यात 1 लाख 1 हजार 560 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.
उडिद 31940
बाजरी 11634
मका 2197
तुर 25145
मुग 7576
कडधान्य 504
भुईमूग 351
तीळ 33
सोयाबीन 4408
कापूस 13714
कांदा 3421

तालुक्यात 1 लाख 1 हजार 560 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके
सुकू लागली आहेत. कापसाची वाढ खुंटली आहे. कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार साधारण 1 लाख हेक्टर क्षेत्रावरील
पिकांना पाऊस नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा