नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचे नाव घेत नाहीये. मागील दोन दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्या ४० हजारांवर पोहचली आहे. देशात मागील २४ तासांत ४४ हजार ६५८ नवे रुग्ण सापडले असून ४९६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नवीन रुग्णांच्या नोंदीसह देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २६ लाख ३ हजार १८८ झाली आहे. त्यापैकी ३ कोटी १८ लाख २१ हजार ४२८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे एकूण ४ लाख ३६ हजार ८६१ जणांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे.
मागील २४ तासांत ३२ हजार ९८८ रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट ९७.६० टक्क्यांवर आहे. देशात सध्या ३ लाख ४४ हजार ८९९ सक्रिय रुग्ण उपचाराधिन आहेत. देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.१० टक्क्यांवर आहे. हा दर गेल्या ६३ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी रेट २.४५ टक्के असून तो गेल्या ३२ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.दरम्यान, गेल्या २४ तासांत ७९ लाख ४८ हजार ४३९ जणांचं लसीकरण करण्यात आलंय. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतपर्यंत ६१ कोटी २२ लाख ८ हजार ५४२ जणांचे लसीकरण झाले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा