भाजपा शासित केंद्र सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना भिकेला लावण्याचं काम केले – राजेसाहेब देशमुख




भाजपा शासित केंद्र सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना भिकेला लावण्याचं काम केले – राजेसाहेब देशमुख

काँग्रेसच्या वतीने जन जागरण अभियान मोठ्या जोषात संपन्न

माजलगाव (प्रतिनिधी) मौजे मनुर देवीचे येथे जिल्हा काँग्रेस कमिटी व काँग्रेसच्या सर्व विंगच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व खासदार रजनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात जन जागरन अभियान यशस्वीरित्या राबवण्यात आले .
यावेळी पंचक्रोशीतील जागृत देवस्थान रेणुकामाता देवी व तुळजाभवानी देवीची महाआरती करण्यात आली.यावेळी जन जागरण अभियानात सहभागी शेतकऱ्यांना उद्देशून जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले कि,”देशातील सर्व सामान्य शेतकरी बांधवांना ,भाजपा शासित केंद्र सरकारने भिकेला लावण्याचं महापाप केले असून ,येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी सतर्क राहून मोदी आणि शहा च्या हुकूमशाहीला सडेतोड उत्तर द्यावे ,तसेच यावेळी अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी एस टी कर्मचारी यांचे आंदोलन भाजपाने हायजक करून आंदोलन चिघळण्याचे पाप केले असून आंदोलनकर्त्यांनी चाणाक्ष पणे सजक राहावे असे आवाहन केले तसेच , जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी काँग्रेस सर्व सामान्य लोकांच्या सोबत असल्याची भावना व्यक्त केली .यावेळी तालुका काँग्रेसचे नेते नारायण होके यांनी प्रस्ताविक केले.तसेच
केंद्र सरकारने केलेल्या प्रंचड महागाईच्या विरोधात गावकऱ्यांमध्ये जनजागरण अभियान करुन गावातच गावकऱ्यांसोबत पारावर भोजन व पारावच रात्रभर झोपून
परत सकाळी संपूर्ण गावभर मोदी सरकारच्या निषेधार्थ प्रंचड घोषणा बाजी करत जनजागरण प्रभात फेरी काढून गावकऱ्यांचा निरोप घेतला.यावेळी गावात काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अँड इनामदार ,शेख आहेमंद, प्रवीन देशमुख, अशोक देशमुख, राहुल मोरे ,सरपंच विनोद सुरवसे, दादा मनुरकर ,अनंत घडशिंगे ,संकेत कासार,धनंजय नायबळ,डीगाबर व्हंडे , महादेव डुकरे सह गावतील सर्व वडीलधारी मंडळी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा