कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आपण गाफील झालो, म्हणून हे संकट उभे राहिले : मोहन भागवत




कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आपण गाफील झालो, म्हणून हे संकट उभे राहिले : मोहन भागवत
कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर आपण सगळे काहीसे गाफील झालो. म्हणून कोरोनाचे हे संकट उभे ठाकले आहे. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. पण तिला न घाबरता तिला परत फिरावे लागेल अशी तयारी आपल्याला करायला हवी आहे, असे मोहन भागवत म्हणाले आहे.

मुंबई : कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर आपण सगळे काहीसे गाफील झालो. म्हणून कोरोनाचे हे संकट उभे ठाकले आहे. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. पण तिला न घाबरता तिला परत फिरावे लागेल अशी तयारी आपल्याला करायला हवी आहे, असे मोहन भागवत म्हणाले आहे. ऑनलाइन व्याख्यान श्रुंखलेमध्ये मोहन भागवत बोलत होते.
जगभरात कोरोनाची परिस्थिती अजूनही आटोक्यात आलेली नसताना भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसलेला आहे. रुग्णसंख्येसोबतच दिवसेंदिवस कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणेसोबतच प्रशासनासमोर देखील मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोरोनासंदर्भात जनतेला आवाहन केले आहे. त्यासोबतच, देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटाविषयी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
यावेळी मोहन भागवत म्हणाले की, जे धैर्यवान लोक असतात, ते कायम प्रयत्न सुरूच ठेवतात. आपल्यालाही तसेच करायचे आहे. संपूर्ण भारताला एक समाज म्हणून सर्व भेदभाव विसरून, गुणदोषांच्या चर्चांमध्ये न अडकता एकसंघ बनून काम करावे लागणार आहे. एकमेकांच्या गुणदोषांची चर्चा करण्यासाठी नंतर वेळ मिळणारच आहे. अजीम प्रेमजींनी सांगितले त्यानुसार वेगाने काम करावे लागले. पुणे शहराचे उद्योजक, प्रशासक, रुग्णालय, जनतेचे प्रतिनिधी या सगळ्यांनी एक टीम म्हणून प्रयत्न केला. सामुहिक प्रयत्न आवश्यक आहेत,असे मोहन भागवत म्हणाले आहे.
यावेळी मोहन भागवत या सर्वांनीच वैज्ञानिकतेचा आधार घेण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही चर्चा ही वैज्ञानिकतेच्या आधारावरच तपासून घेतली गेली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. वैज्ञानिकतेचा आधार घेणे आवश्यक आहे. कुणी सांगते म्हणून ते योग्य आहे किंवा एखादी गोष्ट नवीन आहे म्हणून ती योग्य आहे किंवा जुनी आहे म्हणून योग्य आहे असे माहितीच्या बाबत करू नका. जे काही तुमच्यापर्यंत येतेय, त्याचे वैज्ञानिकतेच्या आधारावर परीक्षण करूनच त्याचा स्वीकार करा. आपल्याकडून कोणतीही निराधार बाब समाजात जाऊ नये आणि आपणही अशा बाबीचं पालन करता कामा नये याची काळजी घ्यायला हवी. आयुर्वेदाच्या नावावर अनेक चर्चा अशा सुरू असतात. पण वैज्ञानिकतेच्या तर्कावर जोपर्यंत त्या गोष्टी सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत अशा गोष्टींबाबत सावध राहणं आवश्यक आहे, असे देखील त्यांनी नमूद केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा