अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखण्यात महिला व बाल विकास विभागाला यश




मुलींचा विवाह 18 वर्षापेक्षा कमी वयात केल्यामुळे मुलींचे शारिरीक व मानसिक प्रचंड प्रमाणात नुकसान होत असल्याबाबत वैद्यकीय निरीक्षणानुसार सिध्द झालेले आहे.
त्यामुळे बीड जिल्ह्यातील कोणत्याही आई वडिलांनी आपल्या मुला-मुलींचा विवाह मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 21 वर्षे पुर्ण झाल्याशिवाय करू नये.

बीड । जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात दोन बालविवाह होत असल्याबाबत दि. 17 मे रोजी गुप्त माहिती चॉईल्ड लाईन ला फोन कॉल द्वारे मिळाली. चॉईल्ड लाईन कडुन प्राप्त माहिती बीड चे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री व्ही.एम. हुंडेकर यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही एम हुंडेकर यांनी शिरूर कासार येथिल प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प शिरूर कासार श्री जायभाय यांच्याशी संपर्क साधुन कान्होबाचीवाडी येथे होणारे बालविवाह रोखण्याबाबत सांगितले. या प्रकरणाची चौकशी शिरूर कासार पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी डी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करून हे दोन्ही बालविवाह रोखण्यात यश मिळाले.

पुणे स्थित महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्थेच्या कार्यक्रम व्यवस्थापक तथा उपायुक्त श्रीमती मनिषा बिरारीस यांच्या सुचनेनुसार अक्षय तृतीया च्या मुहुर्तावर व त्या दरम्यान बीड जिल्ह्यात होणा-या बालविवाहावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी , बीड श्री व्ही.एम.हुंडेकर यांची करडी नजर आहे. त्यामुळे त्यांनी यंत्रणा सज्ज केलेली आहे.त्यानुसार त्यांना शिरूर तालुक्यात दोन अल्पवयीन बालिकांचे विवाह होत असल्याबाबत चॉईल्ड लाईन च्या टोल फ्री क्रमांकावर माहिती प्राप्त झाली होती.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री बी.डी. सानप , ग्रामसेविका खेडकर मॅडम जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाजीराव ढाकणे, बाल संरक्षण कक्ष प्रतिनिधी स्वप्नील कोकाटे चाईल्ड लाईन प्रकल्प समन्व्यक रामहरी जाधव चाईल्ड लाईन टीम मेंबर अश्विनी जगताप तालुका बाल संरक्षण समिती सदस्य समीर पठाण अंगणवाडी सेविका सुजाता प्रल्हाद जाधव अंगणवाडी पर्यवेक्षिका आशा रामचंद्र करपे ,कान्होबाचीवाडी चे उपसरपंच अक्षय जाधव , बबन मोरे यांनी प्रत्यक्ष दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन तेथील माहिती घेतली व हे बालविवाह आहेत अशी खात्री झाल्यामुळे या दोन्ही मुलींच्या आई वडील यांच्या कडून जबाब नोंदवून घेतले आहेत.
बालविवाह होणा-या मुलींच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार होणारी कार्यवाही व कमी वयात मुलींचे लग्न केल्यामुळे मुलींचे शारीरिक व मानसिक बाबतीत होणारे नुकसान याबाबत सामाजिक कार्यकर्ते श्री बाजीराव ढाकणे यांनी सविस्तर माहिती दिली.
अशाप्रकारे मौजे कान्होबाचीवाडी येथे होणारे बालविवाह सर्व टिम व ग्राम बाल संरक्षण समितीच्या समन्वयाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री व्ही.एम.हुंडेकर यांच्या सतर्कतेने रोखले व मुलींच्या कुटुंबांचे समुपदेशन करून मुलींचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तीचा विवाह करणार नाही असे दोन्ही कुटुंबींयाकडुन जबाब नोंदवून घेतले आहेत. बाल विवाह केला तर होणारे परिणाम व शिक्षा याबाबत सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी समजावून सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असलेले जिल्हा बाल संरक्षण कक्ष , बीड व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय बीड हे महिला व बालकांच्या बाबतीत वेगवेगळ्या योजना व अधिनियमाची अंमलबजवणी करून याबाबतीत सतर्कतेने कामकाज करीत असते.
श्रीमती मनिषा बिरारीस कार्यक्रम व्यवस्थापक ,महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था पुणे कडून प्राप्त सुचनेनुसार व माहितीनुसार अक्षय तृतीया च्या मुहुर्तावर त्या दरम्यान होणारे बालविवाह रोखण्यात श्री व्ही एम हुंडेकर , जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बीड कान्होबाचीवाडी येथिल कर्तव्यदक्ष ग्राम बाल संरक्षण समितीच्या पदाधिकारी व शिरूर कासार पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली हे बालविवाह रोखण्यात यशस्वी झाले .

स्थानिक अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने दोन्ही अल्पवयीन बालिकेचे आई-वडिल व कुटुंबियांचे समुपदेशन करून बाजीराव ढाकणे यांनी बाल विवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेतले आहे. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी डी सानप , सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, ग्रामविकास अधिकारी खेडकर , चॉईल्ड लाईन चे रामहरी जाधव ,ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य तथा उपसरपंच अक्षय जाधव , अंगणवाडी पर्यवेक्षिका करपे ,अंगणवाडी सेविका यांच्या सह अनेक सहकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांमध्ये कोरोना आजारा संबंधात काळजी घेऊन सामाजिक दुरावा ठेवण्याची काळजी घेण्यात आली. यापुढे अशा प्रकारचे कोणतेही बालविवाह होत असल्यास चाईल्ड लाईन च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री व्ही एम हुंडेकर यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा