ठाकरे सरकारच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात”




मुंबई : “महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आलेय. कोरोनाच्या ताणाबरोबर बोर्डाच्या परिक्षा होणार की नाही? या तणावाला लाखो विद्यार्थी, पालक सामोरे जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा.”, अशी मागणी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी केलीये.

उपाध्ये म्हणाले, “कोरोनामुळे राज्यात गंभीर परिस्थिती उद्भवलीये, हे जरी खरे असले तरी कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे दीर्घकालीन नुकसान होणार नाही याची जबाबदारी सरकारची आहे. उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतरही राज्य सरकारने दहावी, बारावी परीक्षांच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही. मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठीही वेळ नाही. मुळात ज्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या तीन तासांत कोकणचा वादळी दौरा आटोपला त्या मुख्यमंत्र्यांना या परिक्षांचे महत्त्व आहे की नाही? हा ही प्रश्नच आहे.”

“तीन नापासांनी आपले मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवले आणि राज्यात सरकार स्थापन केले. पण अशी लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही. तेव्हा राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नये. जर राज्य सरकार परिक्षा घेणार नसेल, तर पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया कशी असेल? याबाबतची स्पष्टता अजुनही सरकारने केलेली नाही. परिक्षा न घेण्याचा पर्याय सरकार निवडणार असेल तर ज्याज्या ठिकाणी बारावीचे गुण ग्राह्य धरले जातात त्या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांचे काय? सरकारच्या या वेळखाऊ, धोरण लकव्यामुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होतेय याचे भान या सरकारने ठेवावे.” असे टीकास्त्र उपाध्येंनी सोडले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा