अखेर आषाढी वारीसंदर्भात झाला निर्णय; यंदाही बसनेच जाणार पालख्या !




मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आज पुण्यात आषाढी वारी संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही आषाढी वारीचा सोहळा कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ १० पालख्यांनाच वारी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या दहा पालख्या २० बसेसच्या माध्यमातून पंढरपुरला जाणार आहे. मुख्य मंदिर मात्र भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच असणार आहे. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी आवश्यक असणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
प्रत्येक पालखीसाठी ४० वारकऱ्यांना परवानगी असून पायी पालखीला मात्र यंदाच्या वर्षीही परवानगी नसल्याचे पवारांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तर शासकीय महापूजेचा कार्यक्रम गेल्यावर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल, असे देखील पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर रिंगण आणि रथोत्सवासाठी १५ वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर देहू, आळंदी प्रस्थान सोहळ्याला फक्त १०० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा