लोक नेत्याच्या वारस हक्कावर नाही तर ; लोकनेत्यांच्या विचाराप्रमाणे जनसेवा केली म्हणून दबंग खासदार प्रीतमताई मुंडे यांना मंत्रीपद द्यावे – अशोक रसाळ




बीड । (मांजरसुबा )

देशाचे लोकप्रिय नेते केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे विचार व त्यांनी गोरगरिबांसाठी केलेले कार्य त्यांचे काही राहिलेले अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकप्रिय खासदार प्रीतम ताईसाहेब मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद देऊन स्वर्गीय मुंडे साहेब यांच्या वारस म्हणून नाही तर त्यांच्या हातून गोरगरिबांची सेवा घडत आहे व त्यांच्या हातून होणारे जनसेवेचे मोठे कार्य पुढे चालवण्यासाठी त्यांच्या कार्याला न्याय मिळावा याची दखल म्हणून व हे जनसेवेचे काम अविरतपणे पुढे चालू राहावे त्याला बळकटी मिळावी याकरता दबंग खासदार प्रीतम ताई साहेब यांना केंद्रात मंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा तमाम महाराष्ट्रातील जनतेची आहे,फक्त लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कन्या म्हणून नाही तर त्यांच्या लोकनेते पणाला साजेल असे कार्य करणाऱ्या जनसेवेसाठी सतत झटणाऱ्या आपल्या कार्यातून लोकनेत्याच्या वारस शोभाव्यात अशी कामगिरी करून दाखवणाऱ्या , लोकनेते व त्याच्या विचाराला शोभेल असे कार्य केल्यामुळे आपण मंत्रिपद देऊन सन्मानित करावे अशी तमाम महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे, तरी भारतीय जनता पार्टीतील ज्येष्ठ यांनी या जनतेच्या मागणीला आदरणीय प्रीतम ताई साहेब यांना मंत्रिपद देऊन न्याय द्यावा.
बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार प्रीतम ताई मुंडे साहेब यांच्या कामाची दखल घेऊन व देशाचे नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे विचार चालवण्यासाठी मुंडे समर्थक यांना न्याय देत केंद्रातील महत्वाचे मंत्रीपद आदरणीय खासदार प्रीतम ताई मुंडे यांना बहाल करून काम करण्याची संधी देण्यात यावी भाजपाचे हात बळकट करण्यासाठी आदर्श लोकप्रिय सक्षम पंतप्रधान मोदी साहेब यांनी व देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी प्रीतम ताई मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद देऊन काम करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी भाजपाचे युवा नेते अशोक दादा रसाळ यांनी केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा