नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या




नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नेकनूर । नापिकीला कंटाळून येथील एका ६० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी ( दि .७ ) सकाळी समोर आली आहे . बीड जिल्ह्यात अतवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे . त्यात राज्य सरकारकडून मिळालेली मदत अपुरी असल्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे चित्र आहे . नेकनूर येथील सोनाजी काशिनाथ मुळे ( वय ६० रा . मुळे गल्ली नेकनूर ) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . रविवारी सकाळी सहाच्या वेळेस सर्वज्ञ पेट्रोल पंपाच्या पाठीमागच्या मोरवंडी शिवारात बाभळीच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला . घटनास्थळी ए पी आय शेख मुस्तफा, पोलीस श्री . खांडेकर , श्री . पवार , श्री . राऊत यांनी धाव घेतली आहे . दरम्यान सोनाजी मुळे यांच्या पश्चात दोन मुलं , १ मुलगी असा परिवार आहे . मृतदेहाचे शवविच्छेदन नेकनूरच्या रुग्णालयात करण्यात येणार आहे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा