लग्न झालेकीच 2 दिवसांनी नवरदेवाने केली आत्म हत्या




निञुड ।

ता.माजलगाव येथील पांडुरंग रामकिसन डाके वय २६ वर्षे या तरूणाचे तीन दिवसापूर्वी दि.20नोव्हेंबर रोजी माजलगाव येथे येथील मुलीशी लग्न झाले. लग्नानंतर दोन दिवसांनी म्हणजे सोमवारी दि.२२नोव्हेंबर रोजी लग्नाच्या सत्यनारायणाची पूजा झाली.सोमवारी सत्यनारायण पुजा झाल्यानंतर पाहुण्यांच्या जेवनाच्या पंगती बसल्या असताना नवरदेव पांडुरंग डाके याने शेतात जाऊन गळफास लावून आत्महत्या केली.

अंगाची हळदही पुसली नाही, लग्नाच्या आनंद ताजा असतानाच पांडुरंग याने असा टोकाचा निर्णय घेऊन आपल्या सुखी संसाराची वाटचाल चालु होताच का आत्महत्या केली. असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या दुर्दैवी घटनेने निञुड व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा