अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटाच्या छायेत, वाढदिवस साजरा करणार नाही – धनंजय मुंडे
मुंबई (दि. 14) – माझ्या बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अजूनही खरीप हंगामातील पेरणीच्या दृष्टीने समाधानकारक पाऊस झाला नाही. बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसलेला असताना मी माझा वाढदिवस सार्वजनिक रित्या साजरा करणे संयुक्तिक नाही, असे मत व्यक्त करून राज्याचे नवनिर्वाचित कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी उद्या दिनांक 15 जुलै रोजी असलेला त्यांचा वाढदिवस सार्वजनिक रित्या साजरा करणार नसल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
नवनिर्वाचित कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये जनतेचे प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छा सदैव माझ्यासोबत आहेत, परंतु पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी- बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवून यावर्षी मी वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा न करत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल द्वारे म्हटले आहे.