शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्रात मोठे आंदोलन ऊभे करण्याची गरज आसतांना मात्र ईकडे मिठाया वाटुन जख्मेवर मिटचोळण्याचा प्रयत्न
===============
तलवाडा (शेख आतिख)
तेलंगणा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे तेलंगाना राज्यात शेतकरी हिताचे आणेक निर्णय घेत आहेत. तेथील शेतकऱ्यांसाठी ही बाब हितावाह्य आसलीतरी तेथील निर्णयाचा महाराष्ट्रात फायदा काय? नुकतेच काही दिवसापुर्वी तेलंगानाच्या मुख्यमंत्री महोदयांनी ऐतिहासिक निर्णय घेत तेथील शेतकऱ्यांना १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आन आपल्या कडे मिठाया वाटुन संकटात सापडेल्या शेतकऱ्यांच्या जख्मेवर मिटचोळण्याचा प्रयत्ण काही संधीसाधु पुढा-यांकडुन होत आसल्याची चर्चा शेतकरी वर्गातुन होतांना एैकावयास मिळत आहे. वास्तविक पाहता तेलंगानाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाचीपण कर्ज माफी व्हावी व तेलंगानाचे मुख्यमंत्री राबवत असलेल्या जनहिताच्या योजनाची आमलबजावनी महाराष्ट्र सरकारने सुध्दा करावी यासाठी महाराष्ट्रातील तेलंगानाच्या मुख्यमंत्री आणुयायांनी मोठे जनांदोलन ऊभारुन महाराष्ट्रातील राज्य सरकारला भाग पाडण्याची गरज आसतांना तेलंगानाच्या मुख्यमंत्र्याचे महाराष्ट्रातील विषेशताह गेवराई तालुक्यातील अनुयायी मिठाया वाटुन महाराष्ट्रातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जख्मेवर मिटचोळण्याचा प्रयत्ण करत आसल्याची चर्चा सुज्ञ नागरिकातुन एैकावयास मिळत असुन अब की बार किसान सरकार या वाक्याला पुर्णत्वास आणन्यासाठी तेलंगानाच्या योजनांचा थोडाफार सारांश निवडनुका जाहिर होण्याअाधी महाराष्ट्र सरकार कडुन लाभांवीत होण्यासंदर्भात नुसता तेथील योजनांचा गवगवा न करता मो़ठे जनांदोलन ऊभे करुन महाराष्ट्र सरकारला भाग पाडण्यासाठी प्रयत्ण व्हावेत असे शेतकऱ्यातुन बोलले जात असुन तेलंगानाच्या जनहित योजनांची चर्चा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पहोचावी परंतु मिठाया वाटुन त्यांच्या जख्मेवर मिठ न चोळता राज्यसरकारच्या विरोधात मोठे जनांदोलन ऊभे करत येथेही त्या योजना कार्यनिर्वीत होण्याच्या माध्यमातुन प्रयत्ण झाल्यास नक्किच अबकी बार किसान सरकार! नाहीतर नुसत्या मिठाया वाटल्याने बेकार जाईल मतदान? आस्या प्रतिक्रिया गेवराईतील मिठाई वाटप प्रकारातुन एैकावयास मिळत आहेत.