बीड । ओबीसी प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण पुर्ववत करून ओबीसी समाजाला न्याय द्यावा या मागणीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी गिरवली ता.भूम येथे भेट घेऊन दिले.
याबाबतीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार संवेदनशील व सकारात्मक असून लवकरात लवकर कायदेशीर मार्ग काढण्यात येईल अशी ग्वाही ना.अजितदादा पवार यांनी दिली.
याप्रसंगी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ.सतीश चव्हाण यांच्यासह सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते डॉ. राजीव काळे, बीड जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार सुनील शिंदे उपस्थित होते.