कार्यकर्त्यांचे राजीनामे नाकारत पंकजा मुंडे म्हणाल्या




मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान दिले नसल्याने पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. मुंडे भगिनी समर्थकांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे भाजपासह सगळ्याचेच लक्ष लागलेले होते. पंकजा मुंडे यांनी दिल्लीवरून मुंबईत परतताच भेटीसाठी दाखल झालेल्या समर्थकाशी संवाद साधला. माझा आतापर्यंतचा प्रवास खडतर होता, पुढेही खडतरच दिसतोय, पण अविचाराने निर्णय घ्यायचे नसतात, असे सांगत पंकजा यांनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे नाकारत आहे, असे देखील पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे.
बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात अनेकांनी पदाचे राजीनामे दिले असून, अनेक समर्थक मुंबईत दाखल झाले होते. दिल्लीहून परतलेल्या पंकजा मुंडे यांनी मुंबईत आल्यानंतर नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंकजा म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांनी मला आमदारकीसाठी राजकारणात आणलेले नाही. तर ज्या लोकांना त्यांना उभे केले त्यांच्यासाठी मला त्यांनी राजकारणात आणले. त्यांनी मोठ्या उद्देशाने आणलेले नाही. मला मंत्री करा, माझ्या बहिणीला मंत्री करा यासाठी मी राजकारणात आणलेले नाही. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे लोक माझे कुटुंब आहेत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहे. माझ्या वडिलांचा अंत्यविधी तुम्हाला आठवत असेल. त्यावेळचा असंतोष तुम्हाला आठवते असेल. लोकांच्या मनात गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल प्रेम आहे. मी संघर्ष यात्रा काढली. मी त्यावेळी केलेलं भाषण तुम्ही ऐकलेले असेल. त्यावेळी मी म्हणाले होते की, माझे भांडण नियतीशी आहे. मी मुंडे यांची वारस आहे आणि मला पद हवेय असे मी कधी म्हणाले का कधी? मंत्रीपद हे गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार नाही. जेव्हा माझे अस्तित्व पणाला लागले होते. माझ्याकडे शून्य ताकद होती. पायाखालची जमीन सरकलेली असताना मंत्रीपद नाकारणारी पंकजा मुंडे तुम्हाला राजीनामा द्यायला लावेल का? मला दबावतंत्र वापरायचे नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे नाकारत असल्याची घोषणा केली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा