बीडकरांनी पूरग्रस्तांसाठी मदत देऊन मानव धर्म सांभाळला-राजेंद्र मस्के




मदत फेरी चालूच

 बीड l राज्यातील सुमारे नऊ जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे प्रलयंकारी महापूराचे संकट निर्माण झाले. नैसर्गिक आपत्तीच्या  आघातामुळे शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. तर लाखो जणांना स्थलांतर करण्याची वेळ आली. तिळेय आणि चीपळूण येथील अवस्था दारुण आहे.उध्वस्त झालेले संसार आणि विस्कळीत जनजीवनामुळे तेथे फक्त आक्रोश आणि वेदनांची लाट आहे.

उसवल गणगोत सार… आधार कुणाचा नाही…. हा प्रत्यक्ष अनुभव आज पूरग्रस्त बांधव घेत आहेत.

लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून

 पूरग्रस्तांच्या डोळ्यातील आसु पुसण्यासाठी खारीचा वाटा म्हणून बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीने मदत फेरीचे आयोजन केले होतेसजग  बिडकरांनी  आवाहानाला  प्रतिसाद देत मदत साहित्य देवुन मानव धर्माचे पालन केले. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मदत फेरी  दरम्यान व्यक्त केली.

या मदतफेरीत अॅड. सर्जेराव तात्या तांदळेजगदीश भैय्या गुरखुदेनवनाथ अण्णा शिराळेप्रा.नागरगोजे,सरसलीम जहांगीर,चंद्रकांत फडविक्रांत हजारीभगीरथ बियाणीविजयकुमार पालसिंघनकर ,सुनील मिसाळगणेश पुजारीशिवाजी आप्पा मुंडेडॉ.जयश्री मुंडेसंध्याताई राजपुत,लता बुंदेले,छाया मिसाळशैलजा मुसळे,कांता बांगर,लता रावुत,अनिता जाधव,संग्राम बांगरभुषण पवार,शांतिनाथ डोरलेप्रमोद रामदासी,  वसंत गुंदेकरशरद बडगे ,महेश सावंतहरीश खाडेकिरण बांगरपंकज धांडे ,अनिल शेळकेसखाराम सालपे ,नागेश पवारविलास बामणेदत्ता परळकर,कपील सौदाबद्रीनाथ जटाळ,शाम रावुत,देवा दहे अशोक घोलप मामा,आदी सहभागी झाले होते.

काल निघालेल्या पूरग्रस्तांच्या मदत फेरीला बीड शहरातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू देवून उत्तम प्रतिसाद दिला.  हा प्रतिसाद लक्षात घेऊन आज सकाळी 10.30 वाजता बीड शहरात मदतफेरी काढण्यात येणार आहे.  नागरिकांनी यथाशक्ती मदत देऊन सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा