संजय राऊत तुझ्या दंडात ताकद किती आहे, ते बोल रे -पाटील




 

मुंबई : शिवसेना नेते अन् खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनाच जिंकणार असल्याचा दावा केला आहे. यावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी, चंद्रकांत पाटील चिडून म्हणाले, आरे बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो. तुझ्या दंडात ताकद किती आहे, ते बोल रे, असे म्हणत संजय राऊत यांना चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा डिवचत थेट दम ठोकल्याचे दिसून येते आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भेट नाकारल्याची चर्चा असताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहीनीशी संवाद साधला. यावेळी, चंद्रकांत पाटील म्हणाले, काल रात्री रावसाहेब दानवेंकडे जेवण झाले होते. अमितभाई आणि मोदीजी यांची भेट सोडली तर सगळ्यांच्या भेटी झालेल्या आहे. दिल्लीत अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे आम्ही फॉलोअप घेतला नाही. अमित शाहांनी भेट नाकारली यात काही अर्थ नाही. हे खरे आहे की भेट झाली असती, तर आनंद झाला असता, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील आज दिल्लीवरुन मुंबईला परतले आहे. यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.
तसेच चंद्रकांत पाटील म्हणाले की, अतिशय रुटीन प्रवास होता. प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, मी आमचे वारंवार दिल्लीला जाणे होते. आमचा सातत्याने प्रयत्न असतो, नेक्स्ट जनरेशन उभ केले पाहिजे. त्यामुळे राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल, बावनकुळे, श्रीकांत भारती असा ग्रुप घेऊन नवीन मंत्री झालेल्या भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील यांना भेटलो. त्यांचे देखील अभिनंदन करणे, त्यांची खाती समजून घेणे, असा हा कार्यक्रम होता. साधारण कोव्हिडच्या आधी दरवर्षी खासदारांना जेवण देणे आणि महाराष्ट्रातील मुद्दे सांगणे हे होत होते. गेल्या दोन वर्षात ते झाले नव्हते, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा