शेतीच्या वादातून पंधरा वर्षीय युवकाची हत्या करुन, मृत्युदेह ऊसात फेकला




  1. शेतीच्या वादातून पंधरा वर्षीय युवकाची हत्या करुन, मृत्युदेह ऊसात फेकला.

गेवराई  (प्रतिनिधी) :-तालुक्यातील भेंड टाकळी येथे एका १५ वर्षीय मुलाचा शेतीच्या वादातून खुन केल्याची धक्कादायक घटणा उघडकीस आली. सदरील तरुणाचा खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत्युदेह ऊसाच्या शेतात फेकुन दिला होता.
याप्रकरणी तलवाडा यांनी मुख्य आरोपी यास बेड्या ठोकल्या असून अन्य चार आरोपींच्या शोधात पोलिस आहेत. भेंडटाकळी तांड्यावरील संदिप सोपान चव्हाण (१५ वर्षे) हा शनिवार शेतात एकटा गेला होता. यावेळी शेतीच्या बांधावरुन संदिप चव्हाण आणि किशोर लोंढे यांच्यात वाद घडला होता. संदिपला एकटे पाहून किशोर लोंढे व त्याचे अन्य साथीदार आकाश भगवान लोंढे, सोमनाथ भगवान लोंढे, भगवान विठ्ठल लोंढे, बाळु बळीराम लोंढे यांनी संदिपचा खून करुन त्याचा मृत्युदेह ऊसात फेकुन दिला. दि. ८ रोजी सकाळी राजेंद्र चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तलवाडा पोलिस ठाण्यात संदीप चव्हाण बेपत्ता असल्या तक्रार नोंदवली होती. तलवाडा पोलिसांनी शोध घेतला असता संदिप चव्हाण याचा मृत्युदेह आरोपींच्या ऊसाच्या शेतात आढळून आला. सदरील खूनाच्या घटणेतील मुख्य आरोपी किशोर लोंढे यास दि. १० मंगळवार रोजी रात्री तलवाडा पोलिसांनी बेड्या ठोकून दि ११ रोजी न्यायालय हजर केले आसता त्यास तिन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
संदिप चव्हाण हत्येप्रकरणी तलवाडा पोलिसात कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संदिप चव्हाण याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या मृत्यदेहावर कोणतेच ओळखन नसल्याने शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्याची हत्या कशी केली हे कळेल असे पोलिस उपनिरीक्षक सुभाष माने यांनी सांगितले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा