मी शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत होतो; पण मोदी सरकार…




पिकाला योग्य दर मिळेना म्हणून शेतकरी पीक रस्त्यावर फेकून देत असल्याच्या काही घटना पुढे आलेल्या आहेत. पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होताना दिसत आहे. यानिमित्ताने माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला जोरदार टोले लगावले आहे. माझ्याकडे कृषी खाते असताना शेतकऱ्यांच्या पीकाला योग्य भाव देत होतो असे शरद पवारांनी सांगितलेले आहे. मात्र सध्या लक्ष दिले जात नाही, असा देखील टोला शरद पवारांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव महादेव तथा दादासाहेब काळे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळाव्याला शरद पवार यांची उपस्थिती होती. जुन्नरमधील या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवारांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला.

शरद पवार पुढे म्हणाले की, तोडणीचा देखील खर्च निघत नसल्याने शेतकरी पीक फेकून देताय. कांद्याचा खर्चही निघत नसून अन्य गोष्टींनाही किंमत मिळत नाही. माझ्याकडे १० वर्षीय केंद्रीय कृषी खाते होते. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देणे यावेळी मी कटाक्षाने पाळले. यामुळे शेतकरी या देशाची भूक भागवतोच, मात्र संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवण्याची कामगिरी करु शकतो. शेतकऱ्यांनी हे करुन दाखवले आहे, असे शरद पवारांनी यावेळी सांगितले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा