गावच्या विकासासाठी सतत प्रयत्न करणार- संतोष बेद्रे
पाटोदा। तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध कामे केली जातात.परंतु ग्रामपंचायत भागातील ग्रामपंचायतीसाठी आदर्श ठरत आहे.गावातील जनतेचे प्रश्न हे विविध मार्गांनी सोडवण्यासाठी सरपंच ,उपसरपंच आणि सद्यश हे सतत धडपडत असतात .आज निरगुडी ग्रामपंचायत ने ग्रामसभेचे आयोजन केले असता गावातील जनतेचे प्रश्न जाणून घेऊन ते 100% सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त गावचा विकास कसा होईल या साठी पण प्रयत्न करू असा शब्द सरपंच उर्मिला शिवाजी शेलार यांनी गावकऱ्यांना दिला.या वेळी सभेला उपस्थित युवा नेते मा.संतोष बेदरे. पाटोदा पं.स. चे विस्तार अधिकारी जाधव साहेब, ग्रामसेवक वाघुले साहेब ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तरुण मंडळी आदी.