घाणीचे साम्राज्य असणाऱ्या बीड शहराचा स्वच्छ शहर म्हणून देशात 67 वा क्रमांक




घाणीचे साम्राज्य असणाऱ्या बीड शहराचा स्वच्छ शहर म्हणून देशात 67 वा क्रमांक ?
 बीड  (प्रतिनिधी):- मागील वर्षांमध्ये बीड नगर पालिकेचा देशात 113 क्रमांक होता.स्वच्छ शहर नसतानाही 67 वा क्रमांक आलाच कसा अशी बीड शहरात चर्चा सुरू आहे.
 शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे . सर्वत्र नाल्या तुंबलेल्या आहेत , रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे दिसतात . तसेच बऱ्याच रस्त्यांची चाळणी झाली असून बीडकरांना याचा नाहक त्रास होत आहे . असे असले तरी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये  बीड पालिका देशात ६७ व्या क्रमांकावर  असल्याचे समोर आले आहे . यामुळे आता सर्वेक्षण करणाऱ्या समितीने काय पाहून बीड पालिकेला हा क्रमांक दिला असावा याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे . देशात प्रत्येक वर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविले जाते . यावर्षीही ते नेहमीप्रमाणे राबविण्यात आले . स्वच्छता , रस्ते , नाल्या,शौचालये , कागदपत्रे आदींची अचानक भेट ऑनलाईन तपासनी केली जाते . देशातील १ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या गटात जवळपास ३७५ पालिकांनी यात सहभाग घेतला होता . यात बीड पालिकेचाही समोवश होता .
एप्रिल २०२१ मध्ये एका पथकाने बीड शहराची तपासणी केली होती . यात बीड पालिकेला ६ हजार पैकी ३ हजार ६२१.३१ एवढे गुण मिळाले आहेत . त्यामुळे गुणवतामध्ये बीड नगर पालिका देशात ६७ व्या स्थानी असल्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे . आरोग्य व शहर विकास मंत्रालयाने हे सर्वेक्षण केले होते . हा निकाल ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे . बीड शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे . ठिकठिकाणी नाल्य तुंबलेल्या आहेत , रस्ते उखडले असून पादचा – यांसह वाहनधारकांना कसरत करावी लागते . हद्द वाढ भागात आजही काही लोक उघड्यावर शौचास बसतात . मग काय पाहून मंत्रालयाने पालिकेला देशात ६७ वा क्रमांक दिला ? असा प्रश्न उपस्थित होत आहे . त्यामुळे सर्वेक्षणासाठी आलेली समितीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे . त्याचीच चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
 आगोदर ११३ वा , यावर्षी ६७ गतवर्षी देशात बीड पालिकेचा देशात ११३ वा क्रमांक होता . यावर्षी स्वच्छतेच्या सुधारणा तर काहीच झाल्या नाहीत . तरीही बीड पालिकेने ६७ वा क्रमांक पटकावला आहे . त्यामुळे अश्चर्य व्यक्त होत आहे .. २७ लाख खर्चूनही शहर घाणच शहरात स्वच्छतेचे कंत्राट एका खासगी व्यक्तीला दिलेले आहे . त्यांना एका घरामागे ५१ रुपये दिले जातात . महिन्याकाठी पालिका या कंत्राटदाराला २७ लाख रुपये देतात . परंतु तरीही शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागलेला नाही . हा कंत्राटदार कायमच वादात सापडलेला आहे . कामगारांचे वेतन न देणे , स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे आदी तक्रारी त्यांच्याविरोधात आहेत . तरीही या कंत्राटदारावर कसलीच कारवाई अद्याप झालेली नाही .
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा