बदामराव निष्ठावंतांचा विचार करणार की नवख्यांना संधी देणार ?




बदामराव निष्ठावंतांचा विचार करणार की नवख्यांना संधी देणार ?

तलवाडा l (शेख आतिख) गेल्या आणेक दिवसापासुन राज्यभरात ओ बी सी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आसतांना गेवराई तालुक्यातील तलवाडा सर्कल मध्ये बदामराव पंडित मित्र मंडळाचे फाउंडर आसलेल्या फाउंडेशनच्या निष्ठावंता एैवजी नवख्यांना भावी जि. प. सदस्य झाल्याचे दिवसा स्वप्न पडु लागल्याने खाओ पियो बगल बच्चांचे चांगलेच फावल्याचे चित्र तलवाडा परिसरात दिसुन येत असल्याने बदामराव पंडित जुन्या निष्ठावंतां एैवजी नवख्यांना संधी देणार काय? या चर्तेला सध्या ऊधान आले आहे.

सन १९९२ पासुन बदामराव पंडित मित्र मंडळाच्या माध्यमातुन फाऊंडर आसलेले आणेक निष्ठावंत मावळे त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लाऊन निष्ठेने काम करत आहेत. आसे आसतांना देखील काही मानसिकता हारवलेले नवख्ये मासे ऊलटे पोहत निष्ठावंतांवर अन्याय करण्याच्या तय्यारीत दिसत आहेत. गत जिल्हा परिषदेचा कालावधी जानेवारी आखेर किंवा फेब्रुवारी महिन्याच्या मध्येंतरी संपणार आसला तरी तलवाडा सर्कल मध्ये गेल्या काही दिवसांपासुन राष्ट्रवादी कांग्रेस व शिवसेना या पक्षाच्या तालुक्यातील नेते मंडळीच्या कधीच. साधिज्ञात नसलेले बांगे, मसे, ऊताविळ दिसत आसल्याने राष्ट्रवादीचे तालुक्यातील नेते राजकिय चाणक्य आसल्यामुळे ते अभ्यासपुर्णच ऊमेदवार देतील यात मतदारांना शंका नसली तरी सरळ सभाव आसलेल्या बदामराव पंडित यांना कुणी नवख्याने तथास्तु म्हणन्यास भाग पाडलेच तर बदामराव पंडित हे निष्ठावंतांचा विचार करणार की नवख्यांना संधी देणार? या चर्चेला सध्या तलवाडा परिसरात ऊधान आले असुन तलवाडा सर्कल मधील जुन्या निष्ठावंतां बाबत बदामराव पंडित यांनी शाश्वत भुमिका जाहीर करून नवख्यांच्या हावशीला कुठेतरी पुर्ण विराम जाहीर करावा आशी माफक अपेक्षा या भागातुन समोर येत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा