बंडाने सिद्ध सं’दीप’ आजीचा वसा घेऊन सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा भाऊ




बंडाने सिद्ध सं’दीप’

आजीचा वसा घेऊन सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा भाऊ

वाढदिवस विशेष l

नेतृत्व हि एक गुणवत्ता आहे हि गुणवत्ता आहे पण जेंव्हा कुटुंबातुनच त्या गुणवत्तेची जाणीवपूर्वक हेळसांड होते,थोडक्यात आपल्या अस्तित्वाच्या भीतीने खच्चीकरणाची भावना जन्म घेते त्यावेळी त्या गुणवत्तेला बंडाचे शस्त्र हाती घ्यावे लागते आणि स्वताला सिद्ध होण्यासाठी मार्ग तयार करावा लागतो.हेच तुमच्या-आमच्या,आपल्या भैय्यांना करावे लागले.सत्तेच्या लढाईत आपला केवळ वापर होत आहे. आपल्याला उपजत लाभलेल्या गुणांना वाव मिळत नाही. आपल्यावर जाणीवपूर्वक अन्याय होत आहे. लाभलेल्या वारसाला,आपल्या गुणवत्तेला आपल्यापासून वारंवार हिरावले जाते,तेव्हा संदीप नावाच बंड पेठून उठत आणि निघत संघर्षाच्या वाटेवरून सिद्धता गाठायला.केवळ आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ते पहिल्याच प्रयत्नात सिद्ध होते आणि कौटुंबिक दमछाकीत संदीप भैय्या हे नाव सुलाखून निघते.

अलीकडच्या काळात आपल्यापासून दूर राहणारा, महागड्या गाड्यांमधून फिरून कारभार हाकणारा नेता जनतेला नकोय. त्यांना नेता हवाय त्यांच्यामध्ये उठबस करणारा,त्यांच्याशी संवाद साधणारा,त्यांच्या समस्या जाणून घेणारा. जनतेच्या या सर्व अपेक्षांना पूरक असा आमदार असलेला नेता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बीडकरांनी निवडला. आ.संदीप भैय्यांनी विकासाचा पाईक होऊन जनतेच्या सुखा-दुखातही वेळोवेळी मागे आणि सोबत उभे ठाकले आहे. आमदार नंतर, भाऊ अगोदर अशी भावना आज संदीप भैया नावाप्रती प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. कार्यकर्त्यांवर जिव्हाळा पांघरणारा व युवकांची ताकद असलेला हा नेता सर्वसामान्य जनतेशी सर्वश्रुत प्रीत जुळवून आहे. क्षीरसागरांच्या घरातील असलेला लाडका भैय्या आज घडीला बीड शहराचा नव्हे, मतदारसंघाचा किंबहुना जिल्ह्याचा भैय्या आहे.जिल्हाभराचा भाऊरुपी आधार सिद्ध होण तेही अल्पशा काळात अगदीच सोप्प नाही पण कमी वयातच हे आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी करून दाखवलं आहे. भावकीचा त्वेष आणि द्वेष झेलत विधानसभेच्या पटलावर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना लढा देत आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणीत, धाकला असलेला भैय्या आज थोरल्यांना लोकाभिमुख नेतृत्व काय असते हे दाखवून देत आहे. लोकांच्या गरजांकडे पाठ फिरवून नेतृत्व करण्याचा देखावा करणाऱ्या प्रस्थापितांना संदीप भैय्या हे नाव वेळोवेळी त्यांची जागा दाखवत आले आहे आणि दाखवत राहील. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता हे आ.संदीप भैय्यांच्या वाटचालीचे तत्व आणि धोरण आहे. सामाजिक सलोख्याचा वाहक संदीप भैय्या शिवजयंती, भीमजयंती आणि ईद साजरी करताना लक्षवेधी ठरत असतो. स्व.काकूंचा वारसा आणि वसा घेऊन आ.संदीप भैय्या क्षीरसागर हे बंड सिद्ध झाले आहे. नेतृत्व आणि नेता नेमका काय असतो याचे निरुपण करत आहे. अशा या नेतृत्वाला वाढदिवसाला हैप्पी बर्थडे भैय्या म्हणण्यास यावेळी त्यांच्याकडूनच मज्जाव आहे कारण जिल्ह्यातील स्वकर्तुत्वाने सिद्ध आसलेल्या मेटे साहेबांचे वैकुंठागमन झाल्याचा दुखवटा अजून निघालेला नाही. संदीप भैय्यांच्या या निर्णयातुनही सामाजिक जाण आणि भान असलेला आमचा नेता स्पष्ट होत आहे.शेवटी अंतकरणातून येणाऱ्या शुभेच्छांना शब्दांची गरज काय?

धीरज झाडे,बीड

९३७३६०३११९

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा