बीडची बाजार समिती विभागात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी शेतकरी परिवर्तन महाआघाडीला प्रचंड मतांनी विजयी करा-प्रभाकर कोलंगडे




बीडची बाजार समिती विभागात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी
शेतकरी परिवर्तन महाआघाडीला प्रचंड मतांनी विजयी करा-प्रभाकर कोलंगडे
भ्रष्ट संचालकांना घरचा रस्ता दाखवा -प्रभाकर अप्पा कोलंगडे

बाजार समिती निवडणूकीत शेतकरी परिवर्तन महाआघाडीच विजयी होणार-अशोक लोढा

बीड(प्रतिनिधी) बीड कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक परिवर्तनाची निवडणूक ठरणार आहे.बीडची बाजार समितीही गेल्या अनेक वर्षापासून त्याच जुन्या खोडांच्या ताब्यात आहे. या जुन्या खोडांनी शेतकर्‍यांना कष्टातून आलेल्या संपत्तीवर डोळे ठेवून भ्रष्टाचाराचा मोठा सागर निर्माण केला आहे. बीडच्या बाजार समितीला मराठवाडा विभागात प्रथम आणण्यासाठीच आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. शेतकरी परिवर्तन महाआघाडीची ताकद ही शेतकर्‍यांच्या हितासाठी आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यामुळे शेतकरी परिवर्तन महाआघाडीला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन शिवसंग्रामचे जेष्ठ नेते प्रभाकर अप्पा कोलंगडे यांनी केले. बाजार समिती निवडणूकीत महाआघाडीने सर्वसामान्यांना आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची जाण असलेले उमेदवार दिले आहेत त्यामुळे आता शेतकरी परिवर्तन महाआघाडीच विजयी होणार यात शंका नसल्याचे जि.प.सदस्य अशोक लोढा यांनी म्हटले.
रविवार दि.23 रोजी  चौसाळा येथे   भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, शिवसंग्राम, वंचित ब. आघाडी,  आरपीआय,रासप प्रणीत शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,शिवसंग्रामचे प्रभाकर कोलंगडे,अशोक लोढा, डॉ.बाबु जोगदंड,भाजपाचे सर्जेराव तांदळे, चंद्रकांत फड, अनिल घुमरे,गौतम नाईकवाडे,संतोष जोगदंड, ग्राम पंचायत मतदार संघ आर्थिक दुर्बल घटक उमेदवार गणेश उगले, दिपक काळे, शामराव पडुळे, पंडित माने, शरद झोडगे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसंग्रामचे जेष्ठ नेते प्रभाकर अप्पा कोलंगडे  म्हणाले की, बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक घोटाळे झालेले आहेत. सदरील घोटाळे कोणी केले आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. आतापर्यंत झालेले घोटाळे नक्कीच बाहेर काढूत.दोषी असणार्‍यां विरुध्द शासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यास आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेतकर्‍यांच्या हितासाठीच आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. कायम तेच तेच लोक संचालक होऊन बीडची कृषी बाजार समितीची लुट केलेली आहे.  मार्केट कमिटीतील भ्रष्टाचाराचा अड्डा मोडीत काढण्यासाठी शेतकर्‍यांच्या पोरांना मतदार बांधवांनी संधी देऊन बीड मार्केट कमिटी भ्रष्टाचार मुक्त करा असे  आवाहन शिवसंग्रामचे जेष्ठ नेते प्रभाकर अप्पा कोलंगडे  यांनी केले. यावेळी अशोक लोढा म्हणाले की, बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला लागलेली भ्रष्टाचाराची कीड काढून टाकण्यासाठी शेतकरी परिवर्तन महाआघाडीला सत्ता द्या असे आवाहन त्यांनी केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा