कोरोनाने मृत दोन अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी ५० लाखांचा विमा शासनाने केला मंजूर




बीड । कोरोनाच्या लढाईत पुढे असलेल्या अंगणवाडी सेविकाही आपले कर्तव्य बजावताना बळी जात आहेत . बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरोनाने मृत दोन अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी ५० लाखांचा विमा शासनाने मंजूर केला आहे . त्यांच्या वारसांना हा विमा दिला जाणार आहे . मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामेश्वर मुंडे यांनी ही माहिती दिली . कोरोनाच्या लढाईत अंगणवाडी सेविका या फ्रंटल वॉरिअर आहेत . गावपातळीवर गतवर्षीपासून विविध प्रकारचे सर्वेक्षण करुन गावांना कोरोनामुक्त ठेवण्यात , रुग्ण शोधण्यात अंगणवाडीताईंनी मदत केली आहे . यातच अनेक अंगणवाडीताईंना कोरोनाचीही बाधा झाली . दुर्देवाने जिल्ह्यात पाच जणींचा बळी गेला . दरम्यान , कोरोनाच्या कामादरम्यान मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून ५० लाखांचा विमा दिला जातो.यासाठी पाच प्रस्ताव पाठवेल गेले होते . या पैकी केज तालुक्यातील कासारी तांबवा येथील अंगणवाडी सेविका रत्नमाला बाबासाहेब हजारे व केज तालुक्यातीलच जीवाचीवाडी येथील अंगणवाडी सेविका गौळणबाई रुघुनाथ तांदळे या दोन अंगणवाडी सेविकांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत . शुक्रवारी याबाबतचे आदेश शासनाने काढले . रत्नमाला हजारे यांचा ११ सप्टेंबर २०२० रोजी कोरोनाने मृत्यू झाला त्या ८ दिवस रुग्णालयात होत्या . तर , गौळणबाई तांदळे यांचा २३ सप्टेंबर २०२० रोजी मृत्यू झाला होता . १० दिवस रुग्णालयात होत्या  त्यांना विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामेश्वर मुंडे यांनी प्रयत्न केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा