कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल सर्वांना माहितीये की, जसे सांगितले जातेय की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जादा धोका असल्याचे वर्तविले आहे. महाराष्ट्राच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 14 लाख आहे. तर, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या 25 हजार आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना सुरक्षित वातावरणात केली पाहिजे. बारावीची परीक्षा महिनाभरानंतर राज्यातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, अशी विनंती केल्यांचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करताना लसीकरण हा महत्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
दहावीच्या परीक्षा रद्द
उच्च न्यायालयासमोर आमची भूमिका मांडणार आहोत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर परिणाम होत आहे. आमची बाजू न्यायालयासमोर मांडणार आहोत. सध्याची कोरोनाची परिस्थिती असाधारण आहे. इंटरनेट आणि इतर समस्यांमुळे ऑनलाईन परीक्षेचा विचार करता येत नाही. यामुळे दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे. मुंबई हायकोर्ट सहानुभूतीने निर्णय घेईल. बारावीच्या परीक्षा महिनाभरानंतर घ्याव्या, अशी विनंती केंद्राला करणार असल्याचेवर्षा गायकवाड यांनी सांगितले. अकरावी प्रवेशासंदर्भात चर्चा सुरुये. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे.